या तीन राशींनी काळा धागा बांधल्यास होणार धनलाभ, आणि लग्नाच्या अडचणी सुटणार, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या !

bollyreport
3 Min Read

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत.

ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी ‘वसंतसंपात’ बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

आपण नेहमी पाहतो की लहान बाळाच्या कंबरेत, हातात, पायात काळा धागा बांधलेला असतो, याच कारण असतं की त्या लहान बाळ खूप नाजूक सुंदर असतं, त्यामुळे त्याला कोणाची नजर लागू नये. लहान बाळाला तर नजर लागू शकतेच परंतु एखादी व्यक्ती आपल्या जीवनात सफल होत असेल, अधिक यशस्वी होत असेल तर त्या व्यक्तीला देखील बघ्यांची नजर लागते.

अशा काही राशी देखील आहेत, ज्या राशीचा व्यक्तींनी हातात काळा धागा बांधणे अत्यंत लाभदायक ठरू शकतं, चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या राशी !

१. मीन रास – प्रत्येक राशीला विशिष्ट वर्ण, रंग, स्वामित्व, तत्त्व, इ. असते. राशींची तत्त्वे चार आहेत अशी कल्पना आहे. अग्नि (स्वभावाने कठोर, दाहक), पृथ्वी (स्वभावाने समंजस), वायू (स्वभावाने चंचल, गतिशील) आणि जल (स्वभावाने हळवा). मीन रास ही जल तत्त्वाची रास आहे. मीन रास असलेल्या व्यक्तींनी हातात काळा धागा बांधणं अत्याधिक शुभ मानला जातं.

काळा धागा बांधल्याने कोणाची नजर देखील लागणार नाही. अनेकांना नोकरी व्यवसायात स्थैर्य मिळत नाही, त्यामुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. या काळ्या धाग्यामुळे सर्व समस्या दूर होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल.

२. मिथुन रास – मिथुन रास हि वायुतत्वाची रास आहे. मिथुन रास असलेल्या व्यक्तीने हातात अवश्‍य काळा धागा बांधला पाहिजे. यामुळे तुम्हाला कोणाची वाईट नजर ही लागणार नाही आणि तुमचं कुटुंब सुखात आनंदात नांदेलं.

या राशीची एखादी व्यक्ती रागीट असल्यास रागावर नियंत्रण मिळवून सर्व गोष्टी सुरळीत होतील. तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात व्यवसायिक व आर्थिक गोष्टींसंबंधित अडचणी असल्यास त्या दूर होत त्या व्यक्तीची भरभराट देखील गतीने होईल.

३. कुंभ रास – कुंभ रास देखील वायुतत्वाची रास आहे. कुंभ रास असलेल्या व्यक्तीने आपल्या पायात काळा धागा बांधला पाहिजे कारण त्या व्यक्तींना कोणाचीही वाईट नजर लगेच लागते. कोणाच्याही वाईट नजरेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कुंभ रास असलेल्या व्यक्तीने डाव्या पायात काळा धागा बांधावा.

मानसिक व व्यावसायिक सुख मिळावं यासाठी लोक अनेक मार्ग शोधून सफल होण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही कारणास्तव असफल होतात. हा काळा धागा कुंभ रास असलेल्या व्यक्तींना अधिक फायदेशीर असल्याने त्या व्यक्तीचा समस्या दूर होऊन तो सुखी जीवन जगेल. जाता जाता कमेंट मध्ये जय भोलेनाथ नक्की लिहा !

टीप –
 भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.