कोणत्याही अभिनेत्रीला बिनधास्त किस करणाऱ्या इम्रानचे विद्या बालनला किस करताना पाय थरथत का कापतात जाणून घ्या !

bollyreport
2 Min Read

इमरान हाश्मी आणि विद्या बालन हे इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. दोघांनीही आपल्या अभिनय कौशल्याने इंडस्ट्रीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. दोघेही चित्रपटांमध्ये इंटीमेट सीन द्यायला जराही कचरत नाहीत.

विद्या आणि इमरानने हमारी अधूरी कहानी, घनचक्कर आणि द डर्टी पिचकर यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. घनचक्कर चित्रपटात तर त्यांनी खूप सारे इंटीमेट सीन दिले होते. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हा या चित्रपटाची बरीच चर्चा झाली.

इमरान आणि विद्याने चित्रपटात किसिंग सीन्सही दिले आहेत. पण विद्यासोबत किसिंग सीन शूट करताना इमरान खूप घाबरायचा. या गोष्टीचा खुलासा स्वत: विद्याने केला होता.

विद्यासोबत किसिंग सीन शूट केल्यावर इमरान विद्याला तिचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूरवरुन सारखा एक प्रश्न विचारायचा. विद्याने एका चॅट शो दरम्यान या गोष्टीचा खुलासा केला होता. विद्या एकदा नेहा धुपियाच्या नो फिल्टर या चॅट शोमध्ये गेली होती.

तेव्हा विद्याने सांगितले की, प्रत्येक किसिंग सीननंतर इमरानचे हात पाय थरथरायचे, तो सारखा मला विचारायचा की सिद्धार्थ काय म्हणेल, तुला काय वाटतं ते मला माझा पेमेंट चेक देतील का ? सेटवर इमरानला फक्त सिद्धार्थची चिंता लागलेली असायची. पण तो मला असे प्रश्न का विचारायचा हे मलाच कळायचे नाही.

2012 मध्ये झाले होते सिद्धार्थ आणि विद्या बालनचे लग्न – विद्याने 2012 मध्ये सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले होते. सिद्धार्थ एक प्रसिद्ध निर्माता आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा केला.

इमरानच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सर्वात शेवटी तो मुंबई सागा या चित्रपटात दिसला होता. याशिवाय लवकरच तो टायगर 3 चित्रपटात दिसणार आहे. तर विद्या बालन सर्वात शेवटी शेरनी या चित्रपटात दिसली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.