Headlines

या कारणामुळे बुधवारी मुलगी जात नाही सासरी, कारण वाचून दंग व्हाल !

अखेर का? बुधवारी मुलींना पाठवलं जात नाही सासरी, कारणं ऐकून आश्चर्यचकीत व्हाल.. जसं की आपण सगळे जाणतो भारत हा एक पौराणिक देश आहे. इथे लोक वेगवेगळ्या परंपरेशी बांधले गेलेले आहेत. काही परंपरा तेव्हापासून चालत आलेल्या आहेत, की त्याच्याशी संबंधित इतिहास सुद्धा आता राहिलेला नाही. भारतात शास्त्रांचं खूप महत्व आहे. शास्त्रांमध्ये काही खास दिवसांबद्दल सांगण्यात आलं आहे, ज्या दिवशी काही खास शुभ कामं करायला रोखलं जातं. यात प्रवासापासून काही खास कामांचा उल्लेख आहे. आज आम्ही तुम्हाला बुधवारशी संबंधित अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, असं मानलं जातं की, बुधवारी मुलींना सासरी पाठवलं जावू नये.

होतात सासरशी संबंध खराब : असं मानलं जातं की बुधवारी मुलीची पाठवणी करणं तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलीसाठी खूप दुःखद असू शकतं. विशेषतः जेव्हा मुलीची बुध ग्रह दशा ठीक नसेल तेव्हा असं चुकूनही करू नये.असं सुद्धा मानलं जातं की असं केल्याने रस्त्यात दुर्घटना होण्याचीही शक्यता असते. फक्त हेच नाही तर असं सुद्धा म्हंटलं जातं की यामुळे मुलीचे सासरचे संबंध खराब होतात. शास्त्रात वाईटाशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आलं आहे.

बुद्ध ग्रह चंद्राला आपला शत्रू मानतो : एका पौराणिक मान्यतेनुसार बुध ग्रह चंद्राला आपला शत्रू मानतो. मात्र याच्या उलट चंद्र बुधाला आपला शत्रू मानत नाही. शास्त्रांमध्ये चंद्राला प्रवासाचा घटक मानलं जातं, आणि बुधाला धनलाभाचा. यासाठी असं मानलं जातं की बुधवारी कोणताही प्रवास करणं धोकादायक ठरू शकतं. जर तुमचा बुध खराब असेल, तर दुर्घटनेची शक्यता बळावते. मुलींना बुधवारी सासरी का पाठवलं जात नाही याबाबत आणखी एक कथा प्रचलित आहे.

मधुसूदन नावाचा सावकार : खूप आधीची गोष्ट आहे, एका नगरात मधुसूदन नावाच्या सावकाराचं लग्न खुपचं गुणी मुलगी असलेल्या संगीतासोबत झालं. एकदा मधुसूदनने आपल्या सासरच्यांना संगीताला बुधवारी पाठवायला सांगितले. मात्र संगीताचे आई वडील यासाठी तयार नव्हते. त्यांनी जावयाला खुप समजावलं पण त्याने काही ऐकलं नाही. शेवटी मुलीला पाठवावचं लागलं. ते दोघे बैलगाडीने येत असताना बैलगाडीचं चाक तुटून पडलं. दोघांना चालत जावं लागलं. चालत असताना थोड्या वेळात संगीताला तहान लागली. मधुसूदन पाणी आणण्यासाठी तिला एका झाडाखाली बसवून गेला. थोड्या वेळाने तो परत आला तेव्हा तो बघून हैराण झाला.

मधुसूदनने त्याला विचारलं की तू माझ्या पत्नीच्या शेजारी का बसला आहेस. तेव्हढ्यात समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले, भाऊ ही माझी पत्नी आहे तुम्ही कोण आहात? एवढं ऐकून मधुसूदनला राग आला आणि तो त्याच्यासोबत भांडू लागला. दोघांच्या भांडणामुळे नगरातील शिपाई आले आणि त्या दोघांना राजाकडे घेऊन गेले. राजा निर्णय देऊ शकला नाही, म्हणून दोघांना कारागृहात डांबण्यात येईल असे आदेश दिले. हे ऐकून खऱ्या मधुसूदनची हालत खराब झाली. तेव्हाच आकाशवाणी झाली आणि मधुसूदनला सांगितलं की, बुधवारच्या दिवशी तू जबरदस्ती संगीताला आणलं आहेस, बुध देवाचा हा प्रकोप आहे.

मधुसूदनच्या प्रार्थनेनंतर बुध देवाने केलं माफ : यानंतर मधुसूदनला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो पुन्हा अशी चूक करणार नसल्याचं सांगतो. त्यानंतर त्याने बुध देवाची क्षमा मागितली आणि पुन्हा असं न करण्याची शपथ घेतली. त्याच्या प्रार्थनेनंतर बुध देवाने त्याला माफ केले. त्यानंतर नकली मधुसूदन तेथून गायब झाला. राजा आणि प्रजा हा चमत्कार बघून आश्चर्यचकीत झाले होते. याप्रकारे बुध देवाने मधुसूदनला त्याच्या चुकीचं फळ दिलं.

टीप – पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.