Headlines

खुशखबरी, शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपया ऐवजी आता येतील ३६०००, जाणून घ्या कसा लाभ घेणार !

गेल्या काही वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यासांठी अनेक योजना आणल्या आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक खुषखबर आहे. शेतकऱ्यांसाठी एक नवी योजना आली आहे ज्यात शेतकऱ्यांना सरळ ३६००० रुपयांचा फायदा होणार आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काही नव्या योजना तयार केल्या आहे.

सध्या आपण बोलत आहोत ते पीएम किसान सन्मान निधी बद्दल. ही एक अशी योजना आहे ज्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सरळ पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात प्रतिवर्षी ६००० रुपये ट्रान्सफर केले जातात.
हे पैसे २००० हजार रुपयां प्रमाणे समान हिश्श्यांत विभागले जातात. आणि तुम्हाला ६००० रुपये मिळतात. पण हीच रक्कम आता ३००० रुपये प्रति हफ्ता म्हणजेच वार्षिक ३६००० रुपये अशी करण्याच्या विचारात सरकार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता लागत नाही.

कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ –
१) १८ ते ४० वय वर्ष असलेले कोणतेही शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकता. २) शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त दोन हेक्‍टर शेत जमीन असणे गरजेचे आहे. ३) या योजनेअंतर्गत २० ते ४० वर्षे दर महिना पंचावन्न ते दोनशे रुपये भरावे लागतात. विशेष म्हणजे या गोष्टी शेतकऱ्याच्या वयावरून ठरविल्या जातात.

४) अठराव्या वर्षी या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना दर महिना 55 रुपये भरावे लागतील. ५) तिसाव्या वर्षी या योजनेशी संलग्न झाल्यास ११० रुपये जमा करावे लागतील. ६) चाळीसाव्या वर्षी या योजनेत भाग घेतल्यास २०० रुपये जमा करावे लागतील. तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी चा घेत असाल तर तुम्ही ते पैसे पी एम किसान मानधनयोजना मध्ये सुद्धा भरू शकता.

ही योजना मोदी सरकारने २४ फेब्रुवारी २०१९ ला सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन भागांमध्ये देते. पहिली रक्कम १ डिसेंबर ते ३१ मार्च च्या दरम्यान मिळते. त्यानंतर ची दुसरी रक्कम १ एप्रिल ते ३१ जुलै च्या मधील तर तिसरी रक्कम १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर च्या मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर केली जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !